वर्तमान आयुष्यात भविष्याचा विचार करताना मन फारच दमून जातं..
चाचपडत चाचपडत आधारासाठी भूतकाळात डोकावून पहातं..
मग आठवतात त्या आठवणी.. हृदयाच्या तळ्याशी जपून ठेवलेल्या... समुद्राच्या तळाशी शंख शिंपले असतात अगदी तशा..
मग आठवतात त्या आठवणी .. तो हर्ष तो उत्कर्ष तो जिव्हाळा ती आपुलकी .. तोच सहवास हवा हवासा...
मनाच्या कोपर्यातून हळूच वर येतात त्या आठवणी ... समुद्राच्या लाटांसारख्या...
त्याच लाटांच्या मंजुळ सहवासात ... मनाची नौका पुढे जाते...
तेवढ्यात नाव हेलकावे खाते, वर्तमानाच्या अस्तित्वाची जाणीव होते... भविष्याच्या वादळाची चाहूल लागते...
आणि मन तयार होतं वादळाला सामोरं जाण्यासाठी.. परत तो किनारा गाठण्यासाठी ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा